औरंगाबाद : सतत तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थिती व नतंरची दोन वर्ष अतिवृष्टीमुळे बळीराजासाठी खरीप हंगाम हातचा गेला. परंतु, यंदा रब्बी हंगामात बदलते हवामान डोके दुखी ठरत आहे. मागील आठवड्यातील अवकाळी पावसाची हजेरी तर सध्य स्थितीत ‘जवाद’ चक्रीवादळामुळे बदलेले हवामान रब्बी हंगामासाठी घातक ठरत आहे. या मुळे रब्बीतील हरबरा व गहू पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

गतवर्षी प्रमाणेच कापूस पिकाचे उत्पन्न नसल्याने यंदा ही भाव तेजीत असून सरासरी उत्पन्नात निम्म्या पेक्षाही जास्तीची घट आल्याने उत्पादन खर्च निघाला नसल्याने कापूस पिक आतबट्टयाचे ठरले आहे. अतिवृष्टीमुळे मका पिकात मोठी घट दिसून येत आहे, मका पिकाचे भाव स्थिर असल्याने फक्त खर्चाची ताळमेळ बसणार आहे, आलं पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आणले आहे.

गायी-म्हशींच्या दुधाऐवजी सुरू करा ‘या’ दुधाचा व्यवसाय, काही दिवसांत व्हा मालामाल
यंदाही खरीप हंगाम आत बट्टयाचा ठरल्याने शेत कऱ्यांच्या ‘आशा’ रब्बी पिकावर असताना बेमोसमी अवकाळी पाऊस व सध्यस्थितीतील ‘जवाद’ चक्रीवादळामुळे वातावरण बदलल्याने पुन्हा धुके व थंडीने जागा घेतली आहे. या वातावरणाचा परीणाम रब्बी हंगामातील पेरलेला गहु, हरभरा, सुर्यफूल, कांदा, कांदा बीजोत्पादनावर होत असून यामुळे पिकांची वाढ खुंटली असून याचा परीणाम पुढील पिकाच्या उत्पन्नावर होणार आहे. या सर्व शेतकऱ्यांसाठी प्रतिकुल बाबींचा परीणाम उत्पन्नावर होणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी, हवामान बदलाचा वेध घेऊन पिकांसाठी उपाय योजना कराव्यात, सर्व सामान्य शेतकऱ्यांनी खर्चिक पिकांच्या मागे न लागता, करडई, जवस, सोयाबीन या तेल वर्गिय पिकांकडे रब्बी हंगामासाठी वळावे. सध्याच्या बदलत्या हवामानाचा फटका कांदा, गहु, हरभरा व मोठया प्रमाणावर आंबा या फळबाग पिकांना बसणार असून, शेतकऱ्यांनी काळजी घावी असा सल्ला कृषिभूषण आणि प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब थोरात यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here