हायलाइट्स:

  • ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक
  • सलमानच्या भूमिकेचं कौतुक
  • ओटीटी, पायरसी अशा विषयांवर सलमानने मारल्या गप्पा

सिद्धेश सावंत

०’मुळशी पॅटर्न‘ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक करावा असं का वाटलं?
– मी लेखकाचा मुलगा असल्यामुळे चित्रपटाच्या कथेवर माझं बारीक लक्ष असतं. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाची कथा आणि त्यातील पोलिसाची व्यक्तिरेखा मला आवडली. त्या व्यक्तिरेखेचे अजून काही पैलू दाखवता आले असते असं मला वाटत होतं. ‘अंतिम’ या चित्रपटानं त्या व्यक्तिरेखेला खुलवण्याचं काम केलं आहे. तसंच चित्रपटात अनेक बारीक-सारीक गोष्टींचा विचार केला गेला आहे, हे चित्रपट पाहिल्यावर कळेलच.

० अनेक चित्रपटांतून समाजातील चालीरीती, परंपरा, संस्कृती यावर भाष्य केलं जातं. पण बहुतेक वेळा त्यावर काही मतभेद होतात. याबद्दल तुझं मत काय?
– कलाकार एखादी व्यक्तिरेखा निभावतात तेव्हा कथेला अनुसरून तेथील संस्कृती, भाषा दाखवाव्या लागतात. असे विषय अत्यंत संवदेनशील असल्यामुळे ते चित्रपटात दाखवण्याआधी त्याविषयी संपूर्ण अभ्यास करणं आवश्यक आहे. काळजीपूर्वक आणि जबाबदारीनं चित्रपटामध्ये ते दाखवलं गेलं पाहिजे.’ अंतिम’मध्येही या सगळ्याचा विचार करूनच तिथल्या बोलीभाषेचा तडका दिला आहे.
सलमानच्या आई- वडिलांना लग्नात बोलवू इच्छित होती कतरिना कैफ, पण मिळाला नकार


० लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांना मनोरंजनासाठी ओटीटीचा (ओव्हर द टॉप) पर्याय होता; त्याचा आता सिनेमागृहांवर काही परिणाम होईल असं वाटतं का?
– कितीही पर्याय उपलब्ध झाले तरीही सिनेमागृहांमधली प्रेक्षकांची गर्दी कमी होणार नाही आणि ते कधी बंदही होणार नाही. कुटुंब, मित्र-मैत्रिणी यांच्याबरोबर एकत्र चित्रपट पहायला जाणं ही आपली संस्कृती आहे. सिनेमागृहात वाजणारे शिट्ट्यांचे आवाज ही आमच्यासाठी कौतुकाची थाप असते. तसंच सिनेमागृहात चित्रपट पाहण्याची मजा काही वेगळीच असते. त्यामुळे ओटीटीचा सिनेमागृहांत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवर फारसा परिणाम होणार नाही असं मला वाटतं.

घाईत सुचलेल्या ओळी…स्वानंद किरकिरेंनी शेअर केला ‘बावरा मन’ गाण्याचा खास किस्सा
० दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
– महेश मांजरेकर उत्तम अभिनेते, दिग्दर्शक आणि माझे खूप चांगले मित्र आहेत. शूटिंगदरम्यान ते आजारी असतानाही चित्रपटाचं दिग्दर्शन लांबणीवर गेलं नाही किंवा कामामध्ये त्यांनी कधी आजाराचं कारणही पुढे केलं नाही. त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे.

० चित्रपटांना पायरसीचा धोका असतो. याला कशा पद्धतीनं आळा घालता येईल असं तुला वाटतं
– चित्रपट प्रचंड मेहनतीनं बनवला जातो. अनेकांच्या अथक परिश्रमातून चित्रपट साकार होतो. पायरसीमुळे या मेहनतीला योग्य न्याय मिळत नाही. पायरसी करणाऱ्यांचं फार मोठं रॅकेट आहे. त्यांना आळा घालणं गरजेचं आहे. सरकारनंही यावर कडक कारवाई करून त्यासंदर्भात कठोर कायदा अमलात आणला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here