हायलाइट्स:

  • रत्नागिरीत दापोली, मंडणगड नगरपंचायत निवडणूक
  • निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापले
  • शिवसेना नेते रामदास कदम- पालकमंत्री अनिल परब वाद विकोपाला गेल्याची चर्चा

रत्नागिरी: दापोलीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी झाली असून, आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा निरोप घेऊन आपण आलो असल्याची माहिती पालकमंत्री अनिल परब यांनी दिली. दापोली मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत फक्त शिवसेना व राष्ट्रवादी हेच दोन पक्ष लक्षात ठेवा, बाकी कोणीही काही सांगितले तरी विश्वास ठेऊ नका, असे सांगतानाच परब यांनी रामदास कदम, आमदार योगेश कदम यांचे नाव न घेता टीका केली.

यावेळी उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी आदी उपस्थित होते. शिवसेनेत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करत रामदास कदम व विद्यमान आमदार योगेश कदम यांना थेट पालकमंत्र्यांनी शह दिला असून, पदाधिकारी बदलून एकप्रकारे कदम यांना हा मोठा संदेश दिल्याचे बोलले जाते. कदम व परब यांच्यातील वाद विकोपाला गेल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आमदार योगश कदम व थेट बदलण्यात आलेले पदाधिकारी कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर मनसेत फेरबदल, राज ठाकरेंची ‘ही’ रणनीती विजय मिळवणार का?
दापोली नगरपंचायत प्रचारसभेच्या बॅनरवरुन योगेश कदमांचा फोटो गायब, दळवींनी घेतली जागा; शिवसैनिकांमध्ये तर्कवितर्कांना उधाण

दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी अनिल परब बुधवारी या दोन्ही तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी दापोली व मंडणगड तालुक्यातील शिवसेनेच्या काही नवीन पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या समर्थकांची वर्णी लावण्यात आली आहे. दापोली खेड मंडणगड विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, दापोली तालुका हंगामी तालुकाप्रमुख ऋषी गुजर, मंडणगड तालुकाप्रमुख संतोष गोवले, उपजिल्हाप्रमुख राजकुमार निरगुडकर, दापोली शहरप्रमुख संदीप चव्हाण, उपशहरप्रमुख विक्रांत गवळी यांची आपण हंगामी निवड करत असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली.

‘या’ नगरपंचायत निवडणुकांकडे जिल्ह्याचे लक्ष; शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीसमोर अपक्षांचे तगडे आव्हान
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ रिसॉर्ट चा बिनशेती परवाना रद्द;सोमय्यांची माहिती

शिवसेना पक्षाविरोधी काम करत ज्यांनी अपक्ष फॉर्म ठेवलेत, त्यांना २४ तासांचा अल्टिमेटम देतो. या आघाडीत समील व्हा, असे आवाहन पालकमंत्री परब यांनी केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश महत्वाचा आहे. शिवसेना-राष्ट्रवादी ही अधिकृत आघाडी आहे, असे यावेळी परब यांनी सांगितले. ज्यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केला, त्यांना २१ डिसेंबरनंतर पुन्हा उभे करू नका. संघटनेबरोबर आम्ही आहोत हे मतदानातून दाखवून द्या, असे आवाहन उदय सामंत यांनी केले. जबाबदारी घेऊन सगळ्या तेरा जागा निवडून आणा, असे सामंत यांनी दळवी यांना सांगितले. उमेदवारी अर्ज मागे घेतले असते तर, ही प्रचाराची सभा लावण्याची वेळ आली नसती असेही ते म्हणाले. काम सरकारच्या माध्यमातून झाले, मात्र काहीजण आम्ही केले असे सांगत आहेत, अशी टीका सामंत यांनी रामदास कदम व आमदार योगेश कदम यांचे नाव न घेता केली. अपक्ष उभे आहेत, त्यांना आम्ही फॉर्म द्यायला तयार होतो, मात्र त्यांनी घेतले नाहीत, असा आरोप सूर्यकांत दळवी यांनी करून आमदार योगेश कदम यांच्यावर टीका केली.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here