किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच दापोलीत येऊन अनिल परब आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते. ठाकरे सरकारमध्ये हिंमत असेल तर आता त्यांनी मंत्री अनिल परब यांना वाचवून दाखवावेच, असे खुले आव्हान त्यांनी दिले होते. रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यात परब यांचे रिसॉर्ट असून त्याचे सगळे पुरावे पोलिसांकडे दिले आहेत. कारवाई सुरु झाली असली तरी फौजदारी दाखल करावीच लागेल. ठाकरे सरकारच्या काळातच कारवाई सुरु झाली आहे. मात्र, हे सरकार अनिल परब यांना पाठीशी घालू शकणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते.
आपण जून महिन्यात याविषयी तक्रार नोंदवली होती. कोणतीही चौकशी न करता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मंत्री परब यांना कोणत्या अधारे क्लीन चीट दिली, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. मंत्र्यांची चमचेगिरी करु नका. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महसूल, भारत सरकार पर्यावरण विभाग, तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. बांधकाम तोडण्याचे आदेश निघाले, तरीही जिल्हा पोलीस अधीक्षक कोणत्या आधारे क्लिनचीट देतात, असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला होता. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी परवानगी खोटी होती म्हणूनच रद्द केली. लोकायुक्तांकडे झालेल्या तक्ररीत सगळी माहिती समोर आली आहे. म्हणूनच बिनशेती परवाना रद्द करण्यात आला. त्यावेळी असलेले प्रांताधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी केली होती.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times