औरंगाबाद : जो प्रयत्न अमरावतीत झाला तो पुन्हा जर महाराष्ट्रात झाला तर सोडायचं नाही, असं वक्तव्य करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी असं वक्तव्य केल्याचं बोलले जात आहे.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणतायत, माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, लोकांचा विश्वास संपादन करा. एकदा विश्वास संपादन केला तर निवडणुकीत तुम्हाला मत मागण्याची गरज पडणार नाही. सगळी राजकारणी तुम्हाला जाती-जातीत विभागून ठेवत आहे, असेही यावेळी ठाकरे म्हणाले.