एवढ्यावरच न थांबता जाणकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना थेट ओबीसी म्हणून संबोधलं. या देशात मुस्लिमांवर तर किती अन्याय आहे. गॅरेज बघितले की मुस्लिम, अंड्याचे दुकान बघितले की मुस्लिम, कोंबडीचं दुकान बघितलं की मुस्लिम, कुठं कलेक्टर नाही. बोंबाबोंब आहे. राज्य चालवणारा तिसराच मालक असतो. म्हणून आपण ही गोष्ट लक्षातच ठेवली पाहिजे, असंही यावेळी जानकर म्हणाले.
दरम्यान, ते पुढे म्हणाले की, ‘मराठा समाजाला माझी विनंती आहे. शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण दिलं. मराठ्यांना आरक्षण होतं. पण नंतर मराठ्यांचं आरक्षण का गेलं ? छत्रपती राजे शिवाजी महाराज देखील ओबीसी होते. पण आमच्या तथाकथीत लोकांना वाटलं आमचं गावचं लई मोठं आहे. आम्हाला नको तसलं आरक्षण आणि आज काय अवस्था झाली आहे’, अशा शब्दात जानकर परभणी बोलत होते.