लातूर : न्यायालयाने मागणी केलेला इंपिरिकल डाटा त्वरित न्यायालयात दाखल करावा अन्यथा निवडणूकांमध्ये ओबीसी आरक्षणाविषयी अनास्थेचे धोरण दाखविणाऱ्या सर्वच पक्षांना ओबीसी समाज मतदान करणार नाही. निवडणुकीवर ओबीसी समाज बहिष्कार टाकेल असा परखड इशारा विश्वकर्मा विकास महामंडळ युवा अध्यक्ष सुदर्शन बोराडे यांनी लातूरमध्ये ओबीसी आरक्षण बचाव कार्यक्रमात दिला आहे.

पुढे बोलताना सुदर्शन बोराडे म्हणाले, महाराष्ट्रात मंडल आयोगाच्या अंमलबजावणी मुळे ७३ व ७४ घटना दुरूस्ती झाल्याने ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण मिळाले पुढे सन. २०१० रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने के. कृष्णमूर्ती निकाल दिला. या निवाड्यातील अटींच्या पूर्ततेसाठी ओबीसींची लोकसंख्या व सामाजिक आर्थिक परिस्थिती समजणे आवश्यक ठरले. या साठी ओबीसीचीं जनगणना करण्याची मागणी करण्यात आली.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा मोठा दणका; बडतर्फीच्या कारवाईवर दिला निर्णय

ओबीसी आरक्षणा वाय निवडणूक घेण्याचा निर्णय न्यायालयाने दिलेले दुर्दैवी आहे. राज्य सरकार बरोबर ओबीसींचे आरक्षण टिकवणे ही केंद्राचीदेखील जबाबदारी आहे. केंद्र सरकारकडे ओबीसीचे आरक्षण कोर्टात टिकेल अशा प्रकाचा डाटा आहे. परंतु, केंद्र सरकार तो डाटा सदोष व अनेक चुका असल्याचे कारण देत डाटा देण्यात टाळाटाळ करित आहे. राज्य सरकारनेही हा डाटा गोळा करण्यासाठी आयोग नेमला. परंतु, त्याला लागणार निधी इतर कारणांमुळे या आयोगाचे काम मंद गतीने चालले आहे. त्या न्यायालयाने मागीतलेला डाटा वेळेत जाणार नसल्यामुळे त्याचा परिणाम येणार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकां वर होणार आहे.

राज्यातील २७७८२ ग्रामपंचायतमधील साधारण ५१५०० तसेच ३५१ पंचायत समित्यांमधील १००० आणि ३४ जिल्हा परिषदांमधील ५३५ तर शहरी भागातील ३६९ नगरपरिषदा / नगर पंचायतमधील साधारण २१०० तसेच २७ महानगरपालिकांमधील ७४० अशा सर्व मिळून ओबीसीसाठी आरक्षित असलेल्या जवळपास ५६ हजार जागांनवर या निकालाचा परिणाम होणार आहे. या निकालाची व्याप्ती व परिणाम देशव्यापी असल्यामुळे मोठा राजकीय सामाजिक संघर्ष निर्माण होणार आहे.

राज्य तसेच केंद्र सरकारने न्यायालयाने मागणी केलेला इपिरेकेल डाटा ताबडतोब कोर्टात सादर करून ओबीसीचे गेलेले स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पुर्ववत सुरू करावे ओबीसींच्या सामाजिक घटनात्मक आरक्षणा पासून वंचित ठेऊ नये आन्याथा यांच्या परिणाम होणाऱ्या निवडणूकावर ओबीसी समाज दाखवल्या शिवाय ओबीसी समाज राहणार नाही असेही सुदर्शन बोराडे यांनी सांगितले आहे. यावेळी ओबीसी समाजातील अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सख्ख्या बहिणीवर भावाकडून २ वेळा बलात्कार, न्यायालयाने सुनावली ‘कठोर’ शिक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here