हायलाइट्स:

  • जिल्ह्यात संपकरी बस कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई
  • कामावर रुजू होत नसल्याने विभाग नियंत्रकांनी केली कारवाई
  • संपावर तोडगा निघणार कधी?

जळगाव : एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत संपात सहभागी झालेल्या जळगाव विभागाच्या २२ बस कर्मचार्‍यांवर सोमवारी बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये ८ कर्मचारी जळगाव आगारातील तर १४ कर्मचारी भुसावळ आगारातील आहेत. विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी ही कारवाई केली असून संप काळात जळगाव विभागात करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. (महाराष्ट्रातील सेंट बसचा संप ताज्या बातम्या)

राज्यभरात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचं कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही कर्मचारी मागण्यांवर ठाम आहे. बस कामगार कामावर रुजू होत नसल्याने एसटीची सेवा ठप्प झाली आहे. विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव आगारात कारवाईच्या इशार्‍यानंतर ३५ चालक आणि ३५ वाहक रुजू झाले आहेत. त्यामुळे तीन ते चार मुख्य मार्गावर बसेसवा सुरू आहे. नोटीस देऊनही कामावर रुजू न झाल्याने जळगाव विभागात एकूण ३५० कर्मचार्‍यांवर आतापर्यंत निलंबनांची कारवाई करण्यात आली आहे.

मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला; जिल्ह्यात खळबळ

निलंबनाच्या कारवाईनंतर बस कर्मचार्‍यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जात आहे. मात्र कर्मचारी तारखा मागत आहेत. सदरच्या कर्मचार्‍यांवर कामावर रूजू होण्याबाबत जळगाव विभाग नियंत्रकांतर्फे अल्टीमेटम देण्यात आला होता. त्यानंतरही कर्मचारी कामावर रूजू न झाल्याने जळगाव आगारातील ८ व भुसावळ आगारातील १४ अशा एकूण २२ कर्मचार्‍यांवर सोमवारी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी बडतर्फीची कारवाई केली आहे. कारवाई झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये ११ वाहक तर ११ चालक असल्याची माहिती भगवान जगनोर यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांसाठी प्राणाची आहुती, दिवंगत शिवसैनिकाच्या कुटुंबाला चंद्रकांत खैरेंकडून ५ लाखांची मदत

दरम्यान, शासनाकडून बस कर्मचार्‍यांना कामावर रूजू होण्यासाठी अल्टीमेटम देण्यात आल्यानंतरही कर्मचारी रूजू होत नसल्याने आता विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एकीकडे शासनाकडून मागण्यांवर विविध प्रकारे तोडगा काढला जात आहे, तर दुसरीकडे बस कर्मचारी विलिनीकरणावरच ठाम आहे. त्यामुळे या संपावर अंतिम तोडगा कधी निघणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here