विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यावरुन महाविकासघाडीच्या नेत्यांमध्ये फूट पडल्याची माहिती समोर आली होती. राज्यपालांना डावलून निवडणूक न घेण्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते.

शरद पवार उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यावेळी राज्यपालांच्या परवानगीशिवाय अध्यक्षपदाची निवडणूक रेटल्यास घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो, यावर एकमत झाले.

हायलाइट्स:

  • विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यावरुन महाविकासघाडीच्या नेत्यांमध्ये फूट पडल्याची माहिती समोर आली होती
  • राज्यपालांना डावलून निवडणूक न घेण्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते

मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक रेटून नेण्यावर ठाम असलेल्या महाविकासआघाडी सरकारने तुर्तास या लढाईतून माघार घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्यपालांना पुन्हा पत्र पाठवून निवडणूक कार्यक्रमाला मंजूरी देण्याची विनंती केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विधानसभेच्या हक्कांची जाणीव करुन दिली होती. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे उत्तर दिले. मात्र, हे पत्र लिफाफाबंद असल्याने त्यामधील तपशील समजू शकलेला नाही. परंतु, यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यावेळी राज्यपालांच्या परवानगीशिवाय अध्यक्षपदाची निवडणूक रेटल्यास घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो, यावर एकमत झाले. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
राज्यपाल घटनाबाह्य वागत असतील तर सरकारला राजकीय पावलं टाकावी लागतील: संजय राऊत
विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यावरुन महाविकासघाडीच्या नेत्यांमध्ये फूट पडल्याची माहिती समोर आली होती. राज्यपालांना डावलून निवडणूक न घेण्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. राज्यपालांना डावलून विधानसभाध्यक्षांची निवडणूक झाल्यास घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो, असा सल्ला कायदेतज्ज्ञांकडून सरकारला देण्यात आला. त्यामुळेच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांच्या मंजुरीशिवाय अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास विरोध दर्शविल्याचे सूत्रांनी दिली होती.
मुख्यमंत्र्यांनी धाडलं खरमरीत पत्र, ठाकरे सरकार राज्यपालांच्या परवानगीशिवाय विधानसभाध्यक्षाची निवडणूक घेणार?
राष्ट्रपती राजवटीच्या भीतीने माघार?

विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कालपर्यंत अगदी आग्रही असणाऱ्या महाविकासआघाडी सरकारमध्येच या मुद्द्यावरुन फूट पडली होती. विधानसभाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही होती. मात्र, राज्यपालांच्या परवानगीशिवाय विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक रेटून नेल्यास कायदेशीर प्रश्न उद्भवू शकतात. तसे घडल्यास भाजपकडून यापूर्वीच न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यपालांना डावलले गेल्यास तेदेखील टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यपाल अगदी राष्ट्रपती राजवटीची शिफारसही करू शकतात. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारमधील एक गट कोणताही धोका पत्कारायला तयार नव्हता. त्याऐवजी विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीला मंजुरी मिळाल्यावर विशेष अधिवेशन बोलावता येईल, असा एक मतप्रवाह महाविकासआघाडीत होता.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: cm उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवडणूक 2021 बद्दल फोनवर चर्चा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here