हिंगोली : ओमिक्रॉनक्रोनचं संकट लक्षात घेता बंदिस्त सभागृहात १०० पेक्षा जास्त व्यक्ती नको, तर खुल्या जागेत २५० जणापर्यंत अथवा जे ठिकाण आहे त्या ठिकाणच्या क्षमतेच्या २५ टक्के यातील जी संख्या असेल या उपस्थिती मर्यादेचे पालन करण्याच्या सूचना हिंगोली जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे पुन्हा लग्नसराईमध्ये वर – वधू पित्यांना छापलेल्या लग्नपत्रिका घरात ठेवण्याची वेळ आली आहे.

करोना महामारीनंतर आता ओमिक्रॉनक्रोनचे संकट आणखी गडद होऊ लागले आहे. यामुळे शासनाने लग्न, जिम्स, रेस्टॉरंट, सिनेमा आदी कार्यक्रमावर निर्बंध घातले. त्यामुळे विवाहासाठी छापलेले लग्नपत्रिका घरामध्ये पडून राहण्याची वेळ आली आहे. निर्बंध १०० लोकांचे लग्न पत्रिका छापल्या हजार या शंभर मध्ये कुणाला बोलवायचं कुणाला ठेवायचं असा मोठा प्रश्न वधू-वरांच्या तिथून पुढे उभा राहिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का; २ महिन्यापासून पगार नाही अशात महामंडळाचा नवा घाट
करोना आणि ओमिक्रॉनचे संकट २०२२ मध्ये वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण दिवसेंदिवस रुग्णसंख्या सुद्धा वाढत आहे. २०२२ मध्ये जानेवारी ते मार्चपर्यंत जरी लग्नाच्या तिथी असल्या तरी करोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. नियमांचे पालन न केल्यास त्यास जिल्हा प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार, जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध जारी केले असून त्याचे पालन करणे तितकेच गरजेचे आहे. अशावेळी लग्नसमारंभात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीला कसे समजावावे …? असा प्रश्न वधू-वर पीतं पुढे उभा राहिला आहे.

शूभ कार्य म्हटल्यानंतर या कार्यासाठी मोठा उत्साह आणि घाई असते. यामुळे मंगल कार्यालय बुक करणे, लग्न पत्रिका वाटप करणे, बसता बांधणी करणे, त्याचबरोबर देण्यात येणारी भांडीकुंडी इतर साहित्य खरेदी करताना वर – वधू त्यांचे नातेवाईक दिसत आहेत..

अगोदरच दोन वर्षापासून मंगल कार्यालय बंद होते. सोबतच बँड, डीजे, मंडप वाले, घोडी वाले, व्यवसायिक यांच्यावर मोठे संकट ओढवले होते. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कडक निर्बंध लागतील का या विवंचनेत ही सर्व मंडळी आहे.
लॉकडाऊननंतर रिअल इस्टेट क्षेत्राची बक्कळ कमाई, तिजोरीत भरघोस महसूल जमा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here