मुंबई: करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं राज्यातील तुरुंगांतील गर्दी कमी करण्यासाठी ११ हजार आरोपी आणि गुन्हेगारांची तातडीने परोलवर सुटका करण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रशासनांना दिले आहेत.
७ वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळजवळ ११ हजार आरोपी किंवा गुन्हेगारांना तातडीने परोल देण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आठवडाभरात यावर कार्यवाही व्हावी, अशाही सूचना दिल्या गेल्या आहेत, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times