राज्यात शनिवारी नव्या करोना रुग्णांचा १२ ते १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. मुंबईचा सरासरी करोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हा पॉझिटिव्हिटी रेट १० ते ११ टक्क्यांवरही जाऊन आला आहे.

राजेश टोपे (२)

राज्यात शनिवारी नव्या करोना रुग्णांचा १२ ते १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. मुंबईचा सरासरी करोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

हायलाइट्स:

  • राज्यात शुक्रवारी ८,०६७ नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले
  • यात मुंबईतील पाच हजार ४२८ नवीन बाधितांचा समावेश आहे

मुंबई : राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील काही भागांमध्ये करण्यासाठी पॉझिटिव्हिटी रेट अगदी १० ते ११ टक्क्यांच्या आसपास जाऊन आला आहे. त्यामुळे राज्यभरात निर्बंधाची कठोर अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध वाढवलेही जाऊ शकतात. मात्र, सध्याच्या घडीला राज्य सरकार लॉकडाऊनचा कोणताही विचार करत नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांना घाबरून जाण्याची गरज नाही. लॉकडाऊनचा परिणाम हा अर्थकारणावर होतो, गरिबांना त्याचा फटका बसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीवर याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यावेळी तुर्तास लॉकडाऊन लागणार नाही. पण निर्बंधाची तीव्रता आणखी वाढवली जाऊ शकते, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले.

ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईतील करोना परिस्थिती गंभीर असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. राज्यात शनिवारी नव्या करोना रुग्णांचा १२ ते १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. मुंबईचा सरासरी करोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हा पॉझिटिव्हिटी रेट १० ते ११ टक्क्यांवरही जाऊन आला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पट झाल्याचे टोपे यांनी सांगितले. मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या भागांमध्ये बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता पाहून पुढील निर्णय घेतले जातील. राज्यात जेव्हा ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू लागेल तेव्हा आपोआपच लॉकडाऊन लागेल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
शाळा सुरू राहणार की बंद होणार? काय म्हणाले आरोग्यमंत्री
गेल्या २४ तासांत ८,०६७ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात शुक्रवारी ८,०६७ नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. यात मुंबईतील पाच हजार ४२८ नवीन बाधितांचा समावेश आहे. यावरून राज्यात नवीन करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसभरात १,७६६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात आठ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात ओमायक्रॉनबाधित चार रुग्ण आढळले असून ते वसई-विरार, नवी मुंबई, मिरा-भाईंदर आणि पनवेल परिसरात प्रत्येकी एक बाधित आहे. ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ९७२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५ लाख ७४ हजार ८५९ इतकी झाली. दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ११ हजार ६२० पर्यंत पोहोचला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: ठाण्यात कोरोनाव्हायरस कोविड ओमिक्रॉन रूग्णांची संख्या वाढल्यानंतर लॉकडाऊनच्या अंदाजांवर आरोग्य मंत्री राजेश टोपे
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here