हिंगोली : राज्यात जीवनोन्नती अभियानातून महिलांना आर्थिदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मात्र या बचत बचत गटातील महिलांची प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदणीचे काम असमाधानकारक आहे. राज्यातील २८ लाख महीलांपैकी केवळ १६ लाख महिलांचीच नोंदनी झाल्यानें राज्य कार्यालयाने तीव्र नाराजी व्यक्ती व्यक्त केली आहे. यामधे महिलांसोबत दुर्दैवी घटना घडल्यास विमा मिळवण्यास अडचणी निर्माण होणारं असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात ग्रामीण जिवनोन्नती अभियानामध्ये ग्रामीण भागात महिला बचत गट स्थापन केले जात आहेत. या गटांना बँकांकडून विविध लघुउद्योगांसाठी खेळते भांडवल व कर्ज देखील उपलब्ध करून दिले जात आहे. त्यातून बचत गटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न होत आहेत.

पोलीस पुत्राने विद्यार्थिनीची ‘आयटम’ म्हणून काढली छेड; मुलीने शिकवला ‘असा’ धडा…
यासोबतच गटातील महिलांना प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा लाभ दिला जात आहे. त्यामध्ये महिलांसोबत दुर्देवी घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. त्यासाठी महिलांच्या बँक खात्यातून दरवर्षी ३३० रुपयांचा विमा हप्ता कपात केला जातो. या योजनेमध्ये जास्तीत जास्त महिलांचा विमा काढावा यासाठी बचत गटांमध्ये जनजागृती करून त्यांना विमा काढण्यास प्रवृत्त करण्याचे काम जिल्हा पक्षावर सोपविण्यात आली आहे.

यानुसार राज्यात २८.४६ लाख महिलांचा विमा काढण्याचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १६.९७ आख महिलांचाच विमा काढण्यात आला आहे. याशिवाय महिलांच्या नोंदणीचे काम आहे असमाधानकारक आहे.

सर्दी-खोकल्याच्या साथीमुळे करोना चाचणीही पॉझिटिव्ह, ‘या’ जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here