विरोधकांची टीका…
मुंबई शहरातील ५०० चौरस फूट क्षेत्रावर असलेल्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः दिली होती. त्यानंतर या मुद्यावरून भाजप नेत्यांनी टीका करत, हा निर्णय फक्त आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला असल्याचा आरोप केला होता. तर मुबंई प्रमाणे इतर महानगरपालिका हद्दीत सुद्धा असा निर्णय का घेतला जात नाही, असाही प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता.
Home Maharashtra औरंगाबाद न्यूज लाइव्ह: मुंबईप्रमाणे इतर शहरातही मालमत्ता कर माफ होणार?; सुभाष देसाईंनी...
औरंगाबाद न्यूज लाइव्ह: मुंबईप्रमाणे इतर शहरातही मालमत्ता कर माफ होणार?; सुभाष देसाईंनी दिली महत्त्वाची माहिती – will property tax be waived in other cities like mumbai important information given by subhash desai
औरंगाबाद : मुंबई शहरातील ५०० चौरस फूट क्षेत्रावर असलेल्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय नुकताच ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय फक्त मुंबईपुरताच का ? ,असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. तर ही योजना हळूहळू सर्वच शहरात राबवली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. लसीकरणाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आले असता देसाईंनी माध्यमांशी संवाद साधला.