हायलाइट्स:

  • मुंबईतील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय
  • टास्क फोर्स सदस्यांनी व्यक्त केली चिंता
  • येत्या काही दिवसांत मुंबईतील रुग्णांची संख्या १० हजारांपल्याड
  • नागरिकांनी घाबरून न जाता अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता

मुंबई: मुंबईत करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह आरोग्य यंत्रणा करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याचवेळी मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येबाबत भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत येत्या काही दिवसांत दहा हजारांहून अधिक रुग्णसंख्येचा टप्पा पार करेल, असा सावध इशारा महाराष्ट्र राज्य कोविड १९ टास्क फोर्स सदस्य शशांक जोशी डॉ (Dr Shashank Joshi) यांनी दिला आहे. मात्र, नागरिकांनी लगेच घाबरून जाऊ नये. अधिक काळजी घ्यावी आणि करोना निययांचे पालन काटेकोटपणाने करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. (Corona cases in मुंबई)

Maharashtra Lockdown Soon : पुन्हा लॉकडाउनचे संकेत, मुंबई लोकल आणि शाळा-कॉलेजसंदर्भात लवकरच…

मुंबई आणि महाराष्ट्रातील करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात संभाव्य तिसऱ्या लाटेचा शिरकाव झाल्याचे संकेत सध्या तरी मिळत आहेत. ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्येही वेगाने वाढ होत आहे. मुंबईत ही संख्या अधिक आहे. त्यामुळे विशेष खबरदारी घेतली जात आहे. करोनासह ओमिक्रॉनचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा आणि मुंबई महापालिका सज्ज आहे. असे असले तरी, चिंता वाढली आहे. कोविड १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सावध इशारा दिला आहे. मुंबईतील रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ आहे. सोमवारी करोना रुग्णांची संख्या आठ हजारांहून नोंदवण्यात आली आहे आणि लवकरच येत्या काही दिवसांत हा आकडा दहा हजारांहून अधिक होण्याची शक्यता आहे, असे ट्विट जोशी यांनी केले आहे. गंभीर रुग्णांची संख्या वाढण्याची भीती असून, त्यांना रुग्णालयांत दाखल होण्याची आवश्यकता भासेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. जबाबदारीने करोना नियमांचे पालन करावे आणि दोन मास्क घालावेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अधिक काळजी आणि सतर्कता बाळगावी, असेही आवाहन त्यांनी ट्विटमध्ये केले आहे.

Corona in Mumbai : मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, BMC अधिकारी म्हणाले…
राजकीय नेते करोनाच्या विळख्यात, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनाही करोनाची लागण

मुंबईत शनिवारी ६, ३४७ नवीन रुग्णांचे निदान झाले होते. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. ४५१ रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. शुक्रवारी करोना रुग्णांचा आकडा ५, ६३१ इतका होता. यात शनिवारी १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. शनिवारी राज्यात ९१७० नवीन रुग्णांचे निदान झाले, तर सात जणांचा मृत्यू झाला होता. राज्यातील मृत्युदर वाढला असून, तो २.११ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर शनिवारी १४४५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

लंडनमध्ये निगेटिव्ह, मुंबईत पॉझिटिव्ह;विमानतळावरील करोना चाचणीमुळे गोंधळ

…तर लॉकडाउन घोषित करण्याशिवाय पर्याय राहणार नाही

राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. जर अशाच प्रकारे रुग्णांच्या संख्येत वाढ होत राहिली, तर राज्यात लॉकडाउन घोषित करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही, असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले होते. शहरात रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे, असेही ते म्हणाले. दुसरीकडे शनिवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउन लागू करण्याची तूर्तास शक्यता नाही, असे स्पष्ट केले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती बघता कठोर निर्बंध लागू केले जाऊ शकतात, असेही ते म्हणाले होते.

omicron in maharashtra: राज्यात ओमिक्रॉनचे ६८ नवे रुग्ण; मुंबईत आहे अशी स्थिती!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here