हिंगोली : हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी गावांमध्ये रहिवासी असलेले बबन मरीबा भगत हे मागील दहा वर्षापासून महागड्या बैलजोडीचा सांभाळ करतात, त्याकडे आज घडीला ८ बैलजोड्या आहेत. यामधील प्रेम चोपडा आणि हातोडा या बैलजोडीची किंमत तब्बल पंधरा लाख रुपयांच्या वर आहे. मागणी करून सुद्धा भगत यांनी या बैलजोडीला विक्री केले नाही.

पोटच्या पोरांपेक्षाही सांभाळ करणारे भगत हे सध्या या बैलजोडीच्या आहारामध्ये दररोज अंडी, दूध, काजू, बदाम सुकामेवाचा समावेश करतात. दोन टाईम पिठाच्या उंड्यांमध्ये हा आहार दिला जातो. आतापर्यंत घेण्यात आलेल्या शंकर पटाच्या शर्यतीमध्ये राज्यातील विविध भागात त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली, उत्तम कामगिरीबद्दल ते परिसरात प्रचंड प्रसिद्ध आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात प्रशासनाकडून नवीन निर्बंध लागू, वाचा काय आहेत नवे नियम?
प्रेमचोप्रा व हातोडा या बैलजोडीच्या जोरावर बघत यांनी आतापर्यंत बरीच कमाई केली आहे. हाती आलेले पैसे ते सर्व या बैलजोडी वर खर्च करतात. बैलांचा आहार त्यांचे राहण्याचे व्यवस्थापन, वर्षभराचे नियोजन ते याच पैशातून करतात. सध्या ते या बैलजोडीच्या माध्यमातून नवीन खरेदी केलेल्या बैलांना प्रशिक्षण देत आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी तयार करत आहेत. दैनंदिन आहारात करिता त्यांचा हजारो रुपये खर्च या जोडीवर ती खर्च होतो.

दमदार खुराकामध्ये दिलेल्या आहारात दररोज एका बैलजोडीला दोन लिटर दूध,असे आठ बैलजोड्या वर वीस लिटर च्या जवळपास दूध दिले जाते, दुधात मिक्स करून अंडी सुद्धा दिली जातात, सोबतच त्याला काजू-बदामाचे देखील जोड असते. सर्व पौष्टिक आहार हा बैलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असतो, जेणेकरून धावण्याच्या शर्यती मध्ये आपला बैल मागे सरला नाही पाहिजे, यासाठी शेतकरी सुद्धा खर्चासाठी मागे चालत नाहीये. भगत यांचा हा नाद खुळा सध्या जिल्हा भरात चर्चेचा विषय ठरतो आहे.

मला करोना झालाच नाही म्हणत पॉझिटिव्ह रुग्ण फरार; संपूर्ण प्रशासन लागलं कामाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here