ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये भीती
औरंगाबाद शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, ग्रामीण भागातील शाळा अजूनही सुरूच आहे. तर अनेक शिक्षक शहरातून अप-डाऊन करून शाळेत पोहोचतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही करोनाचा धोका असल्याचं पालकांचं मत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुध्दा भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Home Maharashtra औरंगाबाद न्यूज लाइव्ह: आता मास्क न घालणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या थेट पगारातून कापणार...
औरंगाबाद न्यूज लाइव्ह: आता मास्क न घालणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या थेट पगारातून कापणार दंड – punitive action against government officials and employees who no longer wear masks
औरंगाबाद : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नागरिकांना मास्क महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती केली जात असून, काही कठोर निर्णय सुद्धा घेतले जात आहे. दरम्यान, असाच काही निर्णय औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तहसील कार्यालयात तहसीलदार रमेश जसवंत यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत घेतला आहे.