हायलाइट्स:

  • सध्या मुंबईत ऑक्सिजनच्या एकूण उपलब्धतेपैकी १० टक्के ऑक्सिजनचाच वापर होत आहे
  • ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे

मुंबई :करण्यासाठी लसीचा एकही डोस न घेतलेल्या लोकांना तिसऱ्या लाटेचा अधिक धोका असल्याचे संकेत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिले. इक्बाल चहल यांनी सध्या मुंबईत ऑक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांची आकडेवारी सादर केली. यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण असे आहेत की, ज्यांनी करोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे साहजिकच ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही, त्यांना करोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे इक्बाल चहल यांनी सांगितले.

तसेच सध्या मुंबईत ऑक्सिजनच्या एकूण उपलब्धतेपैकी १० टक्के ऑक्सिजनचाच वापर होत आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण होण्याचा धोका तुलनेत कमी आहे. लस घेतलेल्या लोकांमध्ये करोनाची लागण झाली तरी त्यांच्यात फार तीव्र लक्षणे जाणवत नसल्याचेही आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितले.

रिक्त खाटा,ऑक्सिजनची निकड पाहून पालिका घेणार निर्णय

मुंबईत दररोजची रुग्णसंख्या २० हजारांच्या पुढे गेल्यास लॉकडाउनबाबत विचार करण्यात येईल, अशी भूमिका घेणाऱ्या मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आता मात्र लॉकडाउनची तूर्तास गरज नसल्याचे स्पष्ट करत मुंबईकरांना दिलासा दिला आहे. ‘आता रुग्णांच्या आकड्याला महत्त्व राहिलेले नाही. ऑक्सिजनच्या वापराची, ऑक्सिजन खाटांची स्थिती काय आहे, हे महत्त्वाचे आहे. ऑक्सिजनची मागणी वाढलेली नाही. रुग्णसंख्या कमी असतानाही ऑक्सिजनचा किंवा आयसीयूचा वापर वाढला, तर निर्बंधांचा विचार करु’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी २० हजारांहून अधिक रुग्ण आढळले. त्यापैकी फक्त ११० जणांना ऑक्सिजन खाटांची गरज भासली. ११८० रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. ३५ हजारांपैकी फक्त ५९९९ खाटा भरल्या आहेत. ८४ टक्के खाटा रिकाम्या आहेत. ऑक्सिजनचा वापरही नगण्य आहे, या पार्श्वभूमीवर कोणत्याही लॉकडाउनची गरज नाही, असेही चहल यांनी सांगितले.

बर्गर, पिझ्झासाठीही लस बंधनकारक, आरोग्यमंत्र्यांचा इशारा ;आणखी निर्बंधांचे नियम
राज्यात १० जानेवारीपासून नागरिकांना बुस्टर डोस

राज्यात १० जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस द्यायला सुरुवात होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. हे बुस्टर डोस सर्व ठिकाणच्या केंद्रांवर मिळतील. महाराष्ट्रात सध्या कोव्हिशील्डच्या ६० लाख, तर कोव्हॅक्सिनच्या ४० लाख डोसचा तुटवडा आहे. आम्ही ही गोष्ट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्राला लसींचा साठा कमी पडू देणार नाही, अशी आशा असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here