हायलाइट्स:
- अखेर निवडणूक आयोगाकडून निवडणूक तारखांची घोषणा
- सात टप्प्यांमध्ये मतदान होणार
- राजकीय पक्षांना आयोगाकडून अनेक बंधने घालण्यात आली
या निवडणुका घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असला तरीही करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांदरम्यान राजकीय पक्षांना आयोगाकडून अनेक बंधने घालण्यात आली आहेत.
कोणती बंधने पाळावी लागणार?
पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना घरोघरी प्रचार करण्याठी केवळ पाच जणांनाच परवानगी असणार आहे. तसंच १५ जानेवारीपर्यंत जाहीर सभांनाही मनाई करण्यात आली आहे. सभा होणार नसल्याने नेत्यांनी व्हर्च्युअल प्रचारावर भर देण्याची सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. तसंच विजयानंतर रॅली काढता येणार नाही आणि विजयी झाल्यानंतर उमेदवाराचं प्रमाणपत्र घेण्यासाठी फक्त दोन व्यक्तींना परवानगी असणार आहे.
या निवडणुकांमध्ये रोड शो, पदयात्रा, सायकल यात्रा यासाठी पूर्णपणे मनाई असेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटणाऱ्या राजकीय नेत्यांना मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने घातलेल्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या राजकीय पक्षांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्या राज्यात किती जागांसाठी मतदान ?
पाच राज्यांतील तब्बल ६९० विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील ४०३, गोव्यातील ४०, मणिपूरमधील ६०, पंजाबमधील १७० आणि उत्तराखंडमधील ७० जागांचा समावेश असणार आहे.