हिंगोली : सरत्या वर्षाच्या शेवटी काळी पावसाने महाराष्ट्राला मोठा फटका सहन करावा लागला होता. आता नवीन वर्षामध्येसुद्धा पुन्हा तिच पुनरावृत्ती होते की काय अशी धास्ती शेतकऱ्यांना लागली आहे. येत्या चार-पाच दिवसांत पावसासोबत गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकर्यांवर संकट ओढवण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे. औंढा शहरा सोबत, हिंगोली, सेनगाव तालुक्याच्या काही भागात काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसला आहे. तर जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण आहे. आज सकाळीही सूर्यदर्शन झाले नाही. पडत असलेला अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांची धडकी भरवणारा आहे. रब्बी हंगामाची नुकसान होते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना आता सतावू लागली आहे.