ते जालन्यामध्ये बोलत होते. जोपर्यंत ऑक्सिजनची गरज वाढत नाही किंवा रुग्णसंख्या दवाखान्यात जास्त वाढत नाही तोपर्यंत आज लावलेल्या निर्बंधांपेक्षा आणखी निर्बंध वाढवण्याची गरज वाटत नाही, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता नागरिकांनी काळजी घेऊन नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. यासाठी साधी लक्षणं असल्यास घरीच उपचार घ्या, मास्कचा वापर करा. इतकंच नाहीतर गरम पाणी आणि व्यायामही करा.
आरोग्यमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन
यावेळी महाराष्ट्राच्या हितासाठी निर्बंध पाळा, गर्दी टाळण्याचं व लसीकरण करून घेण्याचं कळकळीचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. दरम्यान, काल रात्री माननीय मुख्यमंत्र्यांनी नस्तीला मान्यता दिल्यावर आज रात्रीपासून निर्बंध लागू झाले. ५ पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होता येणार नाही. गर्दी टाळणे हाच महत्त्वाचा भाग असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
करोनाच्या रुग्णांची संख्या २ ते ३ दिवसात दुप्पट होण्याचं प्रमाण महाराष्ट्रात होतं आहे. काल पर्यंत ४० ते ४५ हजार रुग्णांची वाढ होत असल्याने असे निर्बंध लावणे क्रमप्राप्त असल्याचे राजेश टोपे यांनी लागू होत असलेल्या निर्बंधावर स्पष्टीकरण दिले. आता दिवसा जमावबंदी तर रात्री नाईट कर्फ्यु, शाळा कॉलेजेस पूर्णतः बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी परीक्षा वेळेवरच होतील असेही टोपे म्हणाले. (no lockdown in the Maharashtra important information about Rajesh tope after today restrictions)
रेस्टॉरंट, सिनेमा हॉल ५० टक्के क्षमतेत चालवावे, स्पा सलूनदेखील ५० टक्के क्षमतेने चालवावे. अंतर राष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस विलगिकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला असून लग्न, अंत्यसंस्कार यासाठीही जे आकडे ठरवले आहेत त्याचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी केले.
महाराष्ट्राच्या हितासाठी निर्बंध पाळावे
महाराष्ट्राच्या हितासाठी निर्बंध पाळावे, स्वतः सुरक्षित राहून समाज व जनतेला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन आज आरोग्यमंत्र्यांनी केले. १५ ते १८ वयोगटासाठीच्या लसीकरणासाठी पालकांनी पुढाकार घेवून मुलांचे लसीकरण करून घ्यावे तसेच उद्या १० तारखेपासून ६० वर्ष वया पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी बुस्टर डोस देण्यात येणार असून त्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घेण्याची कळकळीची विनंती राजेश टोपे यांनी केली आहे. गर्दी टाळणे हा प्रभावी उपाय असून त्यासाठी कार्यकर्ते व सर्वपक्षीय मंडळींनी देखील गर्दी टाळण्याचे राजेश टोपे यांनी आवाहन केले आहे.
करोनावर लवकर कंट्रोल आणायचा असेल तर गर्दी टाळणे आणि लसीकरण करणे हाच उपाय असल्याचे सांगताना या निर्बंधाना जनतेने वेगळ्या भावनेने न घेता जनतेच्या तसेच महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेतल्याचे टोपे म्हणाले. (no lockdown in the Maharashtra important information about Rajesh tope after today restrictions)
(आजच्या निर्बंधानंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही राजेश टोपे यांच्याबद्दल महत्वाची माहिती)