नागपूर : एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यावर वाहनाचा क्रमांक तोच असल्यास कारवाई होऊ शकते, मात्र ते टाळण्यासाठी आणि वाहनांचे स्थलांतरण सोपे व्हावे यासाठी केंद्र सरकारने वाहन नोंदणीकरीता ‘बीएच’ (भारत) ही नवी नोंदणी मालिका सुरू केली आहे. त्यामुळे राज्य बदलले तरी वाहन क्रमांक बदलावा लागणार नाही.

यामुळे वाहनधारकाने एकदा आपल्या वाहनाची नोंदणी बीएच सिरीजमध्ये केल्यास दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यावर पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही. ही सिरीज त्याच वाहनांसाठी आहे, ज्यांची बदली सतत वेगवेगळ्या राज्यांमध्ये होत असते. याचा सर्वाधिक फायदा केंद्रीय कर्मचारी तसेच सातत्याने बदली होणाऱ्या खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना होईल.

याबाबत बोलताना नागपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी सांगितले की, ‘नागपूर शहरात मागील महिन्यापासून ‘बीएच’ नोंदणीला सुरुवात झाली आहे. परराज्यामध्ये ज्यांच्या सातत्याने बदल्या होत असतात, त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. मात्र या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत कंपनीची दोन राज्यांमध्ये किमान चार कार्यालये असणे आवश्यक आहे.”

ST संपावर प्रशासनाने शोधला पर्याय, कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; ६ खासगी चालकांची नियुक्ती

‘बीएच सिरीज’साठी हे करा

बीएच सिरीजसाठी परिवहन मंत्रालयाच्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना विचारण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. बीएच सिरीज हवी असल्यास दोन वर्षांचा रस्ते कर भरलेला असणे गरजेचे आहे.

असा असेल नंबर

बीएच सिरीजच्या वाहनाच्या नंबर प्लेट्सवर सुरुवातीला दोन संख्यांमध्ये वाहन नोंदणीचे वर्ष, त्यांनतर बीएच, हा भारत सिरीज कोड आहे. त्यानंतर चार अंकी क्रमांक आणि शेवटी राज्याचे शब्द राहतील. बीएचनुसार नोंदणी केल्यास त्या त्या राज्यात संबंधितांना कर भरावा लागणार आहे.

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्करला आजपासून बूस्टर डोस, रात्रीचंही लसीकरण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here