औरंगाबाद : गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये मोबाईलचा क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच इंटरनेट सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये याच मोबाईलच्या आहारी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणाने घरच्यांनी मोबाईल रिचार्जसाठी पैसे दिले नाही म्हणून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील रहाटगाव येथील ही घटना आहे.

अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील राहाटगाव परिसरातील शेती वस्तीवर राहणाऱ्या अक्षय रावसाहेब सातपुते ( वय २१ वर्षे ) याने आपल्या घरातील सदस्यांकडे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, यावेळी घरच्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे घरच्यांनी मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पैसे दिले नसल्यामुळे अक्षय याने घरालगतच्या चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
राज्याची चिंता वाढली, ज्या आमदाराच्या घरी केलं जेवण त्याचा २४ तासात रिपोर्ट पॉझिटिव्ह
अक्षयने आत्महत्या केल्याची घटना सोमवार रोजी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे पैठण पोलीस ठाण्यात सदरील मृत्यूप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार विठ्ठल एडके हे करीत आहे.

लसीकरणावरून ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांवर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनंतर आता आरोग्यमंत्री ही नाराज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here