उस्मानाबाद : करोना आणि साथीचे रोग वाढत असताना लसीकरणावर सरकार सध्या भर देत आहे. पण यातच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. सध्या लसीकरण चालू आहे, त्या लसीमध्ये गाईचे वराह आणि इतर प्राण्यांचे रक्त आहे असं सांगितल तर तुम्हाला खरं वाटणार नाही. परंतु, या लसीमध्ये गाई, वराह म्हणजेच डुक्कर आणि इतर प्राण्यांचे रक्त असल्याचा दावा तुळजापुर येथील पंचगव्य निसर्गोपचार चिकित्सक संजय सोनवणे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

करोना हे एक जागतिक षडयंत्र आहे. करोनाचे विषाणू नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. काही औषधी कंपन्यांनी या विषाणुची निर्मिती केली असून जगाची लोकसंख्या कमी करण्याचा त्यांचा उद्देश आहे, तसेच त्यांच्या औषध विक्रीतून भरपुर नफा कमवयचा आहे, असा आरोप संजय सोनवणे यांनी केला आहे.

धक्कादायक! घरच्यांनी ‘या’ कामासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणाचं टोकाचं पाऊल, पोलिसही हादरले
इतकंच नाहीतर करोना हा साधा आजार आहे. परंतु लोकांचा घाबरुनच मृत्यू होत आहे. जगातील सर्व देशांमध्ये COVID19 या नावाने २०१७ हा कार्यक्रम सुरु झाला असून २०२५ पर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे. लसीकरण ही औषधाची चाचणी आहे. दोन डोस घेवू सुध्दा करोना होतोय याचाच अर्थ ही मात्रा लागू होत नाही. म्हणून बुस्टर डोस सुरु केले. करोना दुसरे-तिसरे काही नसून साधा फ्लू आहे, असाही सोनावणे यांचं म्हणणं. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

दरम्यान, त्यांच्या या आरोपांवर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आली असून याची सत्यता अद्याप पडातळली गेली नाही. त्यामुळे सोनावणे यांच्या दाव्यावर भविष्यात काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

खंजर घेऊन उभा असताना पोलिसांनी पकडलं, घरी झडती घेतली अन् पोलिसही हादरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here