मुंबई: राज्यावर करोनाचं संकट आहे. या आरोग्य आणीबाणीच्या काळात विशेष बाब म्हणून राज्याचे मुख्य सचिव यांना आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांना याआधीही सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. अशा परिस्थितीत विशेष बाब म्हणून राज्याचे मुख्य सचिव यांना आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात यावा, अशी विनंती महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे केली होती. त्यांना यापूर्वी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती आणि ३१ मार्च रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र, राज्यातील आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांचा अनुभव कामास येईल म्हणून, विशेष बाब म्हणून त्यांना तीन महिने मुदतवाढ देण्यात येत असल्याचं केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारला पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, राज्यात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. करोनाचं संकट आणखी गहिरं होत चाललं आहे. अशा परिस्थितीत करोनाशी लढा देण्यासाठी राज्य सरकारसोबत अजोय मेहता यांच्या अनुभवाची गरज आहे. त्यामुळंच त्यांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असं बोललं जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here