औरंगाबाद : करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार बाजारपेठेतील गर्दी, लग्न समारंभ यावर नजर ठेवण्यासाठी ३५ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून व्हिडीओ शूटिंग करुन निर्बंध मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

‘औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणा दक्ष झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्थानिक पातळीवर कठोर निर्बंध राबविण्याची तयारी केले आहेत,’ अशी माहिती पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

Nitin Gadkari Corona Positive : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण
‘गर्दीच्या ठिकाणांहून आणि लग्न समारंभांमधून करोना संसर्गाचे प्रमाण जास्त होत असल्याचे लक्षात आल्यामुळे अशा ठिकाणांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. शहरातील गर्दीची ठिकाणे, बाजारपेठांमध्ये या पथकांच्या मदतीने व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. त्याआधारे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांचेही व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. वाहनांचा क्रमांक आरटीओ कार्यालयाला कळवला जाणार असून, या कार्यालयातर्फे संबंधित वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत पालिकेच्या यंत्रणेने तीनशेपेक्षा जास्त वाहनांची माहिती आरटीओ कार्यालयाला दिली आहे, हे कार्यालय अपेक्षित कारवाई करील,’ असे पांडेय म्हणाले.

अशा आहेत उपाययोजना

– लग्न समारंभांसाठी फक्त ५० जणांनाच उपस्थितीची परवानगी

– या निर्णयाच्या अंमलबजावणीवर करण्याची जबाबदारी वॉर्ड ऑफिसरांची

– कार्यक्षेत्रातील लग्न समारंभांवर लक्ष ठेवणे, लग्नाच्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ शूटिंग करणे, निकषापेक्षा जास्त गर्दी असल्यास आयोजकांवर कारवाई करणे असे अधिकार वॉर्ड अधिकाऱ्यांना प्रदान

मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘आत्मनिर्भर युवक, आत्मनिर्भर उस्मानाबाद’ उपक्रम, तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here