हिंगोली : सद्या स्थितीत हवामान ढगाळ असून, हवेमध्ये गारठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तापमान बऱ्याच प्रमाणात खाली गेलेले आहे. त्यामुळे केळीच्या बागांना मोठा फटाका बसतो आहे. केळीच्या वाढीसाठी १६ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. हिवाळ्यात तापमान १६ अंश सेल्सिअसच्याही खाली जाते, अशा तापमानाचा केळी पिकाच्या वाढीवर मोठा परिणाम होतो.

थंडीचा परिणाम लागवडीवर होणारा परिणाम ऊतिसंवर्धीत रोपे व्यवस्थित सेट होण्यासाठी १६ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान तापमान लागते. थंडी वाढल्याने मृगबाग तसेच कांदेबाग लागवडीच्या केळीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुळावर होणारा परिणाम:-

मुळांची संख्या व लांबी कमी होते. मुळांच्या अन्न व पाणी शोषण क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. पानांच्या वाढीवर होणारा परिणाम – थंडीच्या दिवसांत पाने येण्याचा वेग मंदावतो. पाने कमी अंतरावर येतात त्यामुळे पानांचा गुच्छ तयार होतो.

करोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘असं’ केल्यास करोनाचा प्रसार होणार नाही
अशा परिस्थितीत पानांचा फारच कमी भाग सूर्यप्रकाशच्या संपर्कात येतो, त्यामुळे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. झाडांची वाढ खुंटते आणि उत्पादनावर परिणाम होतो. बुंध्यावर व घडावर होणारा परिणाम केळीच्या बुंध्यावर व घडाच्या दांडयावर काळपट तपकिरी चट्टे दिसून येतात, हे चट्टे वाढत जातात व घड सटकतो. फळवाढीवर होणारा परिणाम घडातील केळीची वाढ फार हळुवार होते.

परिमाणी, घड पक्व होण्याचा कालावधी ३० ते ४० दिवसांनी वाढतो. त्यामुळे घड कापनिस उशिरा येतो. थंडीच्या काळात प्रामुख्याने केळीवर करपा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.

उपाय योजना म्हणून…

* ऊतिसंवर्धीत रोपांची लागवड केल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी व आळवणी करावी.

* बागेच्या चोहोबाजूने वारासंरक्षक उंच वाढणा¬ऱ्या वनस्पती २ ते ३ ओळीत दाट लावाव्यात, त्यामुळे थंड वारे अडवले जाते.

* केळीच्या खोडालगतआच्छादन करावे, जेणेकरून थंडीतील कमी तापमानाचा मुळांच्या वाढीवर परिणाम होणार नाही.

* केळीची कार्यक्षम पाने कापू नयेत, फक्त रोगग्रस्त पाने कापावीत व सुकलेली पाने बुंध्याभोवती तशीच राहू द्यावीत. त्यामुळे बुंध्याचे थंडीपासून संरक्षण होईल.

* थंडीच्या काळात पाणी रात्री द्यावे. पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस बागेच्या चोहोबाजूने बांधावर काडी कचरा जाळून धूर करावा.

* करपा रोगाच्या नियंत्रणासाठी धानुस्टीन १ ग्रॅम किंवा अवतार २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

Weather Today : राज्यात हवामानाचा कहर, कुठे ढगाळ वातावरण तर कुठे थंडीच्या तडाखा वाढला
केळीला कवडीमोल दर मिळत असून लॉकडाऊन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी बागा उद्ध्वस्त केल्या नंतरच्या काळात अवकाळी पावसाचा सुद्धा फटका बसला त्यामुळे केळी बागायतदार उद्ध्वस्त झाले. हिंगोली जिल्ह्यांतील वसमत व औंढा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतले जाते.

परंतु, मिळत असलेला कवडीमोल भाव आणि वातावरणातील होणारे सतत बदल यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सध्या वातावरणात गारठा वाढल्याने केळी बागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे.यांचा परीणाम हा उत्पादन वाढीवर होणार आहे.

‘साहेब, त्याला कायमचा खल्लास केला’, खून करून आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here