हायलाइट्स:

  • महाराष्ट्रातील रुग्णालयांत करोना रुग्ण वाढू शकतात
  • जानेवारी अखेरीपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला वाढू शकते संख्या
  • महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली चिंता
  • ऑक्सिजनच्या मागणीत वाढ

मुंबई: राज्यातील रुग्णालयांमध्ये जानेवारी अखेरीपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला करोना रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढू शकते, अशी शक्यता महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही शक्यता व्यक्त केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आरोग्य विभागानुसार, राज्यात ऑक्सिजनच्या दैनंदिन आवश्यकतेत वाढ झाली असून, सध्याची मागणी ही ४०० मेट्रिक टन इतकी आहे.

‘ऑक्सिजनची मागणी ७०० मेट्रिक टनापर्यंत वाढली तर, कठोर निर्बंधांची आवश्यकता भासेल,’ असे राज्य सरकारनेही स्पष्ट केलेले आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लसीकरण मोहीम अधिक तीव्र केली पाहिजे आणि आवश्यक पावले उचलली पाहिजेत, असेही राज्य सरकारने म्हटले आहे. शहरी भागांबरोबरच राज्यातील ग्रामीण भागातही करोनाचा प्रादूर्भाव वाढलेला दिसून येत आहे, असेही राज्य सरकारने म्हटले आहे.

Corona Update in Maharashtra : करोनानं धास्ती वाढवली; राज्यभरात रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ, ‘ही’ आहे ताजी स्थिती
corona cases in Mumbai: करोनाने पुन्हा टेन्शन वाढवले; मुंबईत नवीन करोनाबाधितांची संख्या वाढली, पण…

‘त्यांना’ ऑक्सिजनची गरज नाही

संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना करोनाचा संसर्ग झाला तरी, त्यांना ऑक्सिजनची गरज भासत नाही. मात्र, लोकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कारण ब्रिटन आणि अमेरिकेसारख्या देशांमध्येही आरोग्य सेवेवर ताण वाढत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे. २ लाख २५ हजार उपचाराधीन रुग्णांमधील केवळ १४ टक्के रुग्ण हे रुग्णालयांत दाखल आहेत, ही एक दिलासा देणारी बाब आहे, असेही ते म्हणाले.

Covid 19 New Discharge Policy: डिस्चार्जबाबत नवे धोरण; करोना बाधित रुग्णाला सलग ३ दिवस ताप आला नाही तर…

महाराष्ट्रातील सद्यस्थिती

या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी आणि मंगळवारी करोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याचे दिसत होते. मात्र, बुधवारी करोनानं पुन्हा डोके वर काढले. बुधवारी राज्यात ४६, ७२३ नवीन रुग्ण आढळले. तर ३२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. याच कालावधीत २८,०४१ करोना रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. एकट्या मुंबईत १६ हजार ४२०, तर पुणे मनपा हद्दीत ४ हजार ९०३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मुंबईत करोनाचा प्रभाव कमी होतोय, आता एवढी एकच गोष्ट करा; महापौरांचं कळकळीचं आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here