दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत अमराठी व्यापारी काय म्हणाले?
मात्र, सरकारने मराठी पाट्यांसदर्भात घेतलेल्या निर्णयावर व्यापारी वर्गातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच, आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही विरोध दर्शवला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध असून, तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच हा निर्णय रद्द केला नाही तर, आम्हाला उच्च न्यायालयात जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
दुकानावर मोठ्या अक्षरात मराठीत नाव लिहायचे की नाही हे आम्ही ठरवू – विरेन शाह
काय म्हणाले सदावर्ते?
मुंबई हे वैश्विक व्यापाऱ्याचे केंद्र आहे. जगातील विविध भाषिक व्यापारी मुंबईत व्यापारासाठी येतात. ट्रेडमार्क किंवा लोगो संदर्भातला अधिकार असेल, त्यावर सरकारने कोणताच विचार केला नाही. त्यामुळे सरकारचा हा निर्णय अत्यंत बालिश आहे. सरकारने तातडीने हा निर्णय रद्द करावा. अन्यथा उच्च न्यायालयात जावे लागेल, असे सदावर्ते म्हणाले. व्यापाऱ्याला त्याच्या अधिकारानुसार दुकानाची मांडणी किंवा सादरीकरण करण्याचा अधिकार आहे. राजकारणासाठी भेद निर्माण करायचा. व्यापाऱ्याला त्रास होईल असा निर्णय घेऊन त्यांचे वाटोळे करायचे, अशी टीकाही त्यांनी केली. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर राज्यपालांनी सही करू नये. सरकारने हा निर्णय रद्द केला नाही तर, त्याविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देऊ आणि दाद मागू, असेही ते म्हणाले.
[url=https://planloansonline.com/]lead loans[/url]
cash advances online