कोणी काय सल्ला दिला यावर शिवसेना किंवा महाविकासआघाडीचे धोरण ठरत नाही. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हापासूनच शिवसेना मराठीच्या मुद्द्यावर लढत आहे. मराठी अस्मिता हाच शिवसेनेचा आत्मा आहे.

राज ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करुन मराठी पाट्यांच्या निर्णयाबद्दल राज्य सरकारचे अभिनंदनही केले होते. तसेच आता सरकारने कच खाऊ नये, असेही म्हटले होते.