पंतप्रधानांच्या बैठकीतील उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीनंतर भाजपच्या नेत्यांनी पुन्हा एकदा टीका करायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनात उपस्थित नव्हते. मंत्रालयात आले नाहीत. आता ते पंतप्रधानांच्या बैठकीलाही गैरहजर राहिले.

पंतप्रधानही अनेक बैठकांना गैरहजर राहतात. कालच्या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. त्यांना कमी का लेखता, असा प्रतिसवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.