मुंबई-मुलगी झाली हो‘ मालिकेत विलास पाटीलची भूमिका साकारणारा अभिनेता किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं आहे. किरण त्यांच्या भूमिकांसोबतच सोशल मीडियावर परखडपणे मत व्यक्त करण्यासाठीही ओळखले जातात. त्यांच्या अनेक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत असते. मात्र आपलं मत स्पष्टपणे मांडणं त्यांना आता भोवलं आहे. एक पोस्टमुळे त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावर मालिकेचे चाहते वाहिनीवर संतापले असून किरण यांनी स्वत: याबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

समाजात घडणाऱ्या गोष्टी आणि राजकीय घडामोडींवर अगदी मोजक्या शब्दात एक पोस्टमध्ये मांडलेलं मत मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं होतं. एक मुलाखतीमध्ये माने यांनीच या संदर्भात खुलासा करत राजकीय घटनांवर भूमिका मांडल्यामुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

यानंतर किरण यांनी फेसबुकवर अजून एक बोचकी टीका करणारी पोस्ट शेअर केली. यात ते म्हणाले की, ‘काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा!’ तुम्ही मला कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी मी नव्याने जन्म घेईन. अशा आशयाची ही पोस्ट होती. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चाहते त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. तसंच हा निवळ दहशतवाद असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे.

प्रतिक्रिया

किरण माने यांच्या पोस्ट खाली एका यूजरने लिहिले, ‘राजकीय भूमिका घेतल्याने आपल्या सर्वांचे लाडके किरण माने यांना स्टार प्रवाहने मालिकेतून काढले आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद नाही का?’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘जो माणूस वास्तव आणि न्यायाच्या बाजूने उभा राहतोय, जो माणूस तुमच्या आमच्या हक्कासाठी इथे उघडपणे व्यक्त होतोय, ज्यावेळी गरज असते त्यावेळी इतर कलाकार गप्प बसलेले असताना हा माणूस तुमचा माझा आवाज होऊन आपली लेखणी आपल्यासाठी झिजवतो आहे, त्या माणसासाठी आता आपण सर्वांनी उभे राहायची गरज आहे.’

सोशल मीडियावर वाहिनीने घेतलेल्या या निर्णयाला प्रेक्षकांचा विरोध होताना दिसत आहे. #istandwith_KiranMane हा हॅशटॅग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत ट्रेंड होत आहे. या ट्रेंडवर वाहिनी आणि मालिका काय प्रतिक्रिया देते याची वाट नेटकरी बघत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here