हायलाइट्स:

  • जळगाव शहरात धक्कादायक घटना
  • १२ वर्षीय मुलाने केली आत्महत्या
  • क्षुल्लक कारणातून उचललं टोकाचं पाऊल?

जळगाव : मकर संक्रांतीच्या दिवशीच जळगाव शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या यश रमेश राजपूत (वय-१२) या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास समोर आली. या मुलाच्या आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी पतंग उडवण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र या माहितीला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. (जळगाव आत्महत्या प्रकरण)

रमेश सुकलाल राजपूत (रा. कांचन नगर) हे पत्नी, मुलगा यश आणि मुलगी सोनी यांच्यासह वास्तव्याला आहेत. रमेश राजपूत हे शुक्रवारी १४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत कामानिमित्त गेले होते, तर त्यांची पत्नी देखील सकाळी स्वयंपाक करून घरकामासाठी बाहेर गेल्या. मुलगा यश आणि मुलगी सोनी हे दोघेच घरी होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास यश राजपूत याने घराच्या वरच्या खोलीत जाऊन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

इंदुरीकर महाराज म्हणतात माळा काढणाऱ्यांसाठीच तिसरी लाट, आरोग्यमंत्र्यांनी लगावला टोला

हा प्रकार बहीण सोनीच्या लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. नातेवाईकांच्या मदतीने यश याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले. या लहानग्याने आत्महत्या करण्याचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताचा नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली.

दरम्यान, रुग्णालयातत मुलाचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here