हायलाइट्स:

  • रत्नागिरीतील हातखंबा तिठा येथे खळबळजनक घटना
  • दुचाकीवरून गावठी बॉम्ब घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडले
  • रत्नागिरीच्या एटीएस पथकाची धडक कारवाई
  • दोघा आरोपींना पोलीस कोठडी

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील (रत्नागिरी) हातखंबा तिठा येथे ९ जिवंत गावठी बॉम्ब घेऊन रत्नागिरीत येणार्‍या वेंगुर्ल्याच्या दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही कारवाई शनिवारी, १५ जानेवारी रोजी सायंकाळी उशिरा करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरूण गावठी हातबॉम्ब घेऊन रत्नागिरीत येणार असल्याची गोपनीय माहिती रत्नागिरी जिल्ह्याच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. यावरून पथकाने सापळा रचून, ही कारवाई केली आहे.

धक्कादायक! न्यूड डान्स, अनैसर्गिक सेक्स… बिल्डर पतीच निघाला नराधम
Kalyan : व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला, भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक

या प्रकरणी रामा सुरेश पालयेकर (वय २२, रा. वरचा वडखोल, वेंगुर्ला) आणि श्रीकृष्ण केशव हदळणकर ( वय २४, रा. वेंगुर्ला ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. रत्नागिरीच्या दहशतवाद विरोधी पथकाने या दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. ग्रामीण पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करून, रविवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

रत्नागिरी जिल्हा हादरला; एकाच घरात तीन वृद्ध महिलांची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय चांदणे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास या पथकाला पालीहून रत्नागिरीच्या दिशेने येणार्‍या दुचाकीवरील दोघांचे वर्तन संशयास्पद वाटले. या पथकाने त्यांची दुचाकी थांबवली. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांच्याजवळ नऊ जिवंत गावठी बॉम्ब आढळून आले.

धक्कादायक! मुंबईत नाल्यात आढळला आई आणि ३ वर्षांच्या मुलाचा मृतदेह, जिथे मृतदेह आढळले तिथून जवळच…

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here