अहमदनगर: करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांमध्ये साठवणूक करण्यात आलेला शिधा विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलावून शिधावाटप करावा. गर्दी करू नये अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
शाळांच्या मुख्याध्यापकांनी शिधावाटप करावा मात्र, कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि शाळांचे मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत धान्य द्यायचे आहे. एखादा किंवा त्याचे पालक आजारी असतील तर, घरी धान्य पोहोच करावे, अशा सूचना या पत्रात देण्यात आल्या आहेत. दरम्यान नगर शिक्षण विभागाने या निर्णयानुसार कार्यवाहीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील शाळांना पत्र पाठवण्यात आले आहे. या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना या पत्रात देण्यात आल्या आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times