आत्महत्येचे कारण अस्पष्ट
रवींद्र बागुल यांच्या खिशात चिठ्ठी वगैरे काहीच आढळून आली नाही. मुलगा ज्ञानेश्वर मोबाईल दुरुस्तीचे काम करतो. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नयन पाटील, हवालदार अनिल फेगडे, दिनेश पाटील यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बागुल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. एक भाऊ पोलीस दलात नोकरीला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विटनेर येथील शेतकर्याचे विष प्राशन
जळगाव तालुक्यातील विटनेर येथील शेतकरी गोकुळ पांडुरंग वराडे (वय ४९) यांनी विष प्राशन करुन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. गोकुळ वराडे मकर संक्रातीला शेतात फवारणीसाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी विषारी द्रव्य सेवन केले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबाने त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना रविवारी रात्री ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वराडे यांनी जळके स्टेट बँक शाखेतून शेतासाठी कर्ज घेतले आहे. त्यांच्याकडे स्वतः च्या मालकीचे विटनेर शिवारात एकूण ८० आर जमिनीचे क्षेत्र आहे. कर्जाच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.