‘या’ जागांसाठी झाली लढत
सर्वसाधारण मतदारसंघांपैकी वैजापूर, फुलंब्री, कन्नड व औरंगाबाद या चार तर महिला राखीव २, आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १ असा एकूण सात जागासाठी सहा मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाली. येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील मतदान केंद्रावर औरंगाबाद सर्वसाधारण मतदारसंघातील सर्व पक्षीय पॅनलचे उमेदवार आमदार हरिभाऊ बागडे यांनी सकाळी साडेआठ वाजता मतदान केले. त्याच्यासमेवत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे, बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सर्वपक्षीय पॅनलच्या उमेदवारासाठी सर्व नेतेमंडळी फोनाफोनी करण्यात व्यस्त असल्याचे पाहण्यास मिळेल.
१०० टक्के मतदान…
जिल्ह्यातील एकूण सहा मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले असून निर्धारित वेळेत सर्व केंद्रावर १०० टक्के मतदान झाले, अशी माहिती सहाय्यक निबंधक (दुग्ध) तुळशीराम भोजने यांनी दिली. यात सकाळी दहा वाजेपर्यंत २१ टक्के, तर दुपारी २ वाजेपर्यंत ९७ टक्के मतदान झाले होते. विशेष म्हणजे पाच केंद्रांवर दुपारी दोन वाजेपर्यंतचे १०० टक्के मतदान झाले होते.
केंद्रनिहाय मतदान
मतदान केंद्र एकूण मतदान झालेले मतदान
औरंगाबाद ६२ ६२
पैठण ३८ ३८
वैजापूर ५० ५०
कन्नड ४६ ४६
सिल्लोड ५६ ५६
फुलंब्री ९४ ९४
एकूण ३४६ ३४६