ऊन पावसाची पर्वा न करता शेकडो कामगार जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून ये-जा करतात. या कामगारांना दुसरा मार्ग २६ किलोमीटरचा वळसा घालून गाठावा लागतो. यामुळे वेळ आणि खर्चाचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी दोन गावातील शेकडो नागरिक दररोज या पुलावरून ये-जा करतात.

 

River

१० इंचाच्या तीन लोखंडी पाईपवरुनन खालून धोधो वाहणाऱ्या खोल नदीच्या पाण्याचा प्रवाह पाहत नागरिकांना ये-जा करावी लागते.

हायलाइट्स:

  • एमआयडीसीकडून हा रस्ता स्व:तासाठी तयार करण्यात आल्याचे कारण देत हा रस्ता दुरुस्त करत नसल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला आहे.
  • एमआयडीसी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की, हा रस्ता धोकादायक असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी नाही

प्रदीप भणगे, कल्याण : टिटवााळा आणि कल्याण दरम्यान असलेल्या आपटी मांजर्ली आणि वसर या गावातील नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. आपटी मांजर्ली आणि वसर ही दोन्ही गावं एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर आहेत. या दोन गावांच्यामधून उल्हास नदी वाहते. याठिकाणी एमआयडीसीचे पाणी उदंचन केंद्र असल्यामुळे एमआयडीसीने दोन गावांना जोडणारा चार फुट रुंदीचा रस्ता नदीतून तयार केला आहे. मात्र, पावसाळ्यात नदीला आलेल्या पुरात रस्त्याचा काही भाग पाण्याच्या प्रवाहांबरोबर वाहून गेल्याने स्थानिक लोकप्रतिनिधीनी स्वखर्चाने या तुटलेल्या रस्त्यावर लोखंडी पाईप टाकून रस्ता जोडण्याचा प्रयत्न केला आहे. १० इंचाच्या तीन लोखंडी पाईपवरुनन खालून धोधो वाहणाऱ्या खोल नदीच्या पाण्याचा प्रवाह पाहत नागरिकांना ये-जा करावी लागते. पलीकडील वसर गावापासून अंबरनाथ , बदलापूर हायवे अतिशय जवळ असल्यामुळे आणि रायते, टीटवाळा सह दहागाव, रायते या जवळपास १२ ते १५ गावातून जवळपास २ ते ३ हजार कामगार अंबरनाथ एमआयडीसी मधील कंपन्यामध्ये काम करत आल्याने या कामगारांना कंपनीत येण्या जाण्यासाठी हा रस्ता स्वस्त आणि जवळचा पडतो.

यामुळे ऊन पावसाची पर्वा न करता शेकडो कामगार जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून ये-जा करतात. या कामगारांना दुसरा मार्ग २६ किलोमीटरचा वळसा घालून गाठावा लागतो. यामुळे वेळ आणि खर्चाचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी दोन गावातील शेकडो नागरिक दररोज या पुलावरून ये-जा करतात. अतिशय धोकादायक असलेल्या या रस्त्यावरून लहान मुले आणि महिलांना दुसरीकडे जाण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागते. दररोजची ही कसरत करताना नागरिक मेटाकुटीला आले असून तुटलेला हा रस्ता दुरुस्त करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. मात्र, एमआयडीसीकडून हा रस्ता स्व:तासाठी तयार करण्यात आल्याचे कारण देत हा रस्ता दुरुस्त करत नसल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की, हा रस्ता धोकादायक असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी नाही. मात्र नागरिक जीव धोक्यात घालून या पुलावरून ये जा करत आहेत. या नदीवर शासनाच्या माध्यमातून पूल किंवा रस्ता झाल्यास या गावाचा शहराशी थेट संपर्क होऊ शकेल. मात्र अस्तित्वातील रस्ता धोकादायक असल्याने तो नागरिकांनी वापरू नये असे आवाहन एमआयडीसी अधिकार्यांनी केले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : dangerous pool on river in village near kalyan titwala
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here