औरंगाबाद बातम्या लाईव्ह: औरंगाबादकरांना दिलासा, ५ दिवसांनंतर करोनासंबंधी आली मोठी बातमी – consolation to aurangabadkars after five days new corona patients came in half
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील वाढती करोना रुग्णांची संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरत होती. मात्र, असे असताना सोमवारी प्रशासनाला कुठेतरी दिलासा मिळाला असून पाच दिवसांनंतर जिल्ह्यातील नवे करोना रुग्ण संख्या निम्म्यावर आली आहे. सोमवारी दिवसभरात ५९६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
गेली सहा दिवस सलग नवीन रुग्णांचा आकडा हजारच्या पुढे जात होता. तर सोमवारी हाच आकडा ५९६ वर आला आहे. काल दिवसभरात शहरात ४६३ आणि ग्रामीण भागात १३३, अशा ५९६ करोना रुग्णांची वाढ झाली. तर गेल्या २४ तासांत ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सोमवारच्या आकड्यांनी औरंगाबादकरांना दिलासा दिला असल्याचं म्हणता येईल. दूध संघाचा अध्यक्ष कोण होणार?, संचालक मंडळाच्या बैठकीकडे लक्ष
शाळा आजपासून उघडणार
२४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, मात्र स्थानिक पातळीवर स्थानिक परिस्थिती पाहून शाळा उघडता येईल असंही सरकारकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे काल झालेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ग्रामीण भागातील आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.