हायलाइट्स:

  • ‘पाकिस्तानचे अफगाण-तालिबानसोबतचे संबंध सुधारू नयेत, ही भारताची इच्छा’
  • ‘रॉ’कडून स्थानिक गुंडांना पैसे, शेख रशीद यांचा आरोप
  • ‘भारताला अफगाणिस्तानात एका मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं’

इस्लामाबाद, पाकिस्तान :

पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांचा पुन्हा एकदा जीभेवरचा ताबा सुटलाय. भारताविरुद्ध विखारी वक्तव्य करताना त्यांनी भारतावर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोपही केलाय. ‘अफगाणिस्तानात भारताचा दाणून पराभव झालाय. त्यामुळेच भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’ (RAW – Research and Analysis Wing) पाकिस्तानातील शांततापूर्ण वातावरण बिघडवण्यासाठी स्थानिक गुंडांना पैसे देत आहे’ असं वक्तव्य शेख रशीद यांनी केलंय. सिनेटमध्ये बोलताना त्यांनी ही टीका केली.

‘यापुढे सरकार आणि टीटीपी दरम्यान कोणतीही चर्चा होणार नाही. पाकिस्तानविरोधी घटकांशी चर्चा शक्य नाही, पाकिस्तानचे अफगाण-तालिबानसोबतचे संबंध सुधारू नयेत, हीच भारताची इच्छा आहे. कारण भारताला अफगाणिस्तानात एका मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय,’ असं त्यांनी पाकिस्तान आणि तालिबानच्या चर्चेसंबंधी बोलताना म्हटलंय.

Russia-Ukraine Crisis: तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? रशिया – युक्रेन तणावामागची कारणं समजून घ्या…
रशिया विरुद्ध युक्रेन : ‘नाटो’ युक्रेनला पुरवणार लष्करी बळ

पाकिस्तानातील बिघडत्या परिस्थितीचं खापर भारतावर

यावेळी शेख रशीद यांनी भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’वर पाकिस्तानमध्ये अशांतता फैलावण्याचा आरोप केलाय. गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत, असं म्हणताना रशिद यांनी भारताकडे अप्रत्यक्षरित्या इशारा केला आहे. ‘गेल्या वर्षी लाहोरमधील जौहर टाऊन बॉम्बस्फोटात भारताचा हात होता. ‘भारतीय संशोधन आणि विश्लेषण शाखे’नं दहशतवादी कारवाया करण्यासाठी स्थानिक गुन्हेगारांची मदत घेतली’ असा आरोपही त्यांनी केला.

‘अफगाणिस्तानातील सद्य वातावरण पाकिस्तानविरोधी नाही. अफगाणिस्तानात ‘रॉ’ आणि ‘एनडीएस’चा पराभव झाल्याचं वक्तव्य शेख रशीद यांनी गेल्या आठवड्यात केलं होतं.

अफगाणिस्तानात आपल्या विरुद्ध लढणाऱ्या जवळपास ४२ आंतरराष्ट्रीय सैन्याचा पराभव तालिबानकडून करण्यात आलाय.

Joe Biden: जेव्हा राष्ट्राध्यक्ष पत्रकाराला माईकवर ‘शिवी’ हासडतात…
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच… पाकिस्तानातून हवाईमार्गानं भारतात दाखल होणार पर्यटक!
ड्युरंड लाईनवर पाक गृहमंत्री म्हणतात…

शेख रशीद यांनी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील ड्युरंड लाईनवर बोलताना मात्र आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानच्या सीमेवर केवळ २१ किमी कुंपणाचं काम उरलंय, असा दावा त्यांनी या भागात पाकिस्तानकडून उभारल्या जाणाऱ्या कुंपणाविषयी बोलताना केला.

तालिबानकडून हे कुंपण उखडून फेकण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तान लष्कराला साहित्य जागेवरच टाकून तिथून पळ काढावा लागला होता. याबद्दल बोलताना, ‘ही केवळ एक लहान भागातील घटना आहे’ अशी सारवासारव त्यांनी केली. पाकिस्तान-इराण सीमेवर २०० किमीच्या उर्वरित भागात कुंपण घालण्याचं कामही सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय.

‘मानवी तस्करी’चे बळी? थंडीत गारठून कॅनडा-अमेरिका सीमेवर गुजराती कुटुंबाचा मृत्यू, एकाला अटक
Pakistan: ‘मला राजीनामा द्यायला भाग पाडलं तर…’, पाक पंतप्रधानांची विरोधकांना धमकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here