औरंगाबाद : राज्य सरकार मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्याच्या निषेधार्थ नियुक्त्या रखडलेल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शिवनेरी ते मुंबई आक्रोश वाहन यात्रा निघणार आहे. नऊ मार्चपासून निघणारी यात्रा मुख्यमंत्री उद्ध‌व ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या बंगल्यावर धडकणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

मराठा समाजाच्या रखडलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. राज्य सरकार हेतुत: दुर्लक्ष करीत असल्याची टीका करीत संघटनेने आक्रोश वाहन मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. समन्वयक रमेश केरे यांनी ही घोषणा केली. २०१४ आणि २०१९ मध्ये महावितरणच्या नियुक्तीत अन्याय झालेले विद्यार्थी, मराठा संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते वाहन यात्रेत सहभागी होणार आहेत.

Weather Alert Maharashtra : राज्यात हुडहूडी, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद
शिवनेरी येथे अभिवादन करून नऊ मार्च रोजी सकाळी १० वाजता आक्रोश वाहन यात्रा निघणार आहे. पनवेल, नवी मुंबई, चेंबूरमार्गे यात्रा मुंबईत जाणार आहे, असे केरे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राहुल पाटील, पवन उफाड, नागेश शिंदे, सदानंद जाधव, संदीपान मोटे, अविनाश अंभोरे, धर्मराज जाधव, प्रवीण ढोले आदी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री आदित्य आजपासून औरंगाबाद दौऱ्यावर, पण त्यापूर्वीच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here