हिंगोली : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर अजूनही तोडगा न निघाल्याने हिंगोली जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आज प्रजासत्ताक दिनी भीक मांगो आंदोलन केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरांमध्ये वसमत आगारातील कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. तीन महिन्यापासून आमच्या पगारी नसून आम्हाला भीक मागण्याची वेळ आली आहे.

शासन काय आमच्या मागण्या मान्य करत नाही आहे. आता आम्ही भीक मागून जगायचं का? असा सवाल एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. वसमत शहरांमध्ये रस्त्यांवर फिरुन एसटी आंदोलकांनी आज भीक मागो आंदोलन केलं आहे. आजच्या आंदोलनातून जमा झालेले पैसे प्रशासनाला पाठविणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.

लाल परीची चाकं अखेर धावली, ‘या’ जिल्ह्यात १०४८ कर्मचारी कामावर हजर
सहानुभूती पूर्वक विचार करून आमच्या मागण्या केल्या पाहिजे. आर्त हाक हिंगोलीत एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आजच्या आंदोलनाचा मूळ उद्देश म्हणजे या आंदोलनाकडे कारचे लक्ष वेधले आहे. आंदोलकांनी वसमत विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे त्यांची भेट घेऊन मागण्या मान्य करण्यासंदर्भात शासन दरबारी चर्चा करावी अशी विनंती केली आहे. आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमच्या भूमिकेवर ठाम आहोत असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

राज्यात प्रजासत्ताक दिनाला गालबोट? ३ जिल्ह्यांमध्ये झाला आत्मदहनाचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here