औरंगाबाद : औरंगाबादच्या क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना करण्यात येत आहेत. तसेच १० फेब्रुवारीला महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, त्यापूर्वीच एमआयएम, मराठा क्रांती मोर्चा आणि भाजप यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे.

महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात नियोजन प्रशासनाकडून सुरू असून, औरंगाबाद महानगरपालिका या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाताने करण्याचे नियोजन करत असल्याचं बोलले जात आहे. तर दुसरीकडे पुतळ्याचे उद्घाटन शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हातानेच केले जावे, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. तर एमआयएमनेदेखील हीच भूमिका घेतली आहे.

ओमिक्रॉनबद्दल आली धक्कादायक माहिती समोर, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांकडून इशारा
मराठा क्रांती मोर्चा आणि एमआयएमकडून अशी भूमिका घेतली जात असतानाच, भाजपने वेगळीच भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन १० फेब्रुवारीऐवजी १९ फेब्रुवारीला म्हणजेच शिवजयंतीच्या दिवशी करावे अशी भूमिका घेतली आहे. तर १० फेब्रुवारीला उद्घाटन केलं तर आम्ही विरोध करू अशी भूमिका भाजपने घेतली आहे.

ST Strike Update : एसटी संप मिटला का? गुरुवारी राज्यात ८ हजार बसेस धावल्या, आता फक्त १० आगार बंद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here