मुंबई: राज्यात सुपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ इन शॉप पद्धतीने वाइनची विक्री ही संकल्पना राबवण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तर विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार उत्तर दिले आहे. तुम्हाला विरोधच करायचा असेल तर, भाजप नेत्यांनी आपल्या आणि कार्यकर्त्यांच्या मालकीचे वाइनरी आणि बीअर कारखाने बंद करून बाटलीबंद पाणी विकावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाइड क्रस्टो यांनी दिला.

राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर टीका केली. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. शेतकरी, कष्टकरी, गरीब, बारा बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने करोनाच्या काळात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ दारूलाच आहे. महाविकास आघाडी सरकार नेमके आहे तरी कोणाचे, असा सवाल फडणवीस यांनी केला होता. हे सरकार सत्तेच्या नशेत धुंद असल्याची टीकाही त्यांनी केली होती.

Devendra Fadnavis: भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द; देवेंद्र फडणवीस म्हणाले…
नरेंद्र मोदींची ती ‘मन की बात’ संजय राऊत यांनी सांगितली; म्हणाले, भाजपच्या लोकांनीच..

भाजपच्या नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिले आहे. विरोधच करायचा असेल तर, तुमच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे वाइनरी आणि बीअरचे कारखाने बंद करून बाटलीबंद पाणी विक्री करावी, असा सल्ला क्रास्टो यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

12 आमदारांचं निलंबन लोकशाही वाचवण्यासाठी | संजय राऊत

शिवसेनेनेही दिले होते प्रत्युत्तर

वाइन ही फळांपासून बनवली जाते आणि शेतकरी ती फळे पिकवत असतो. सरकारने वाइनच्या विक्रीला सूट दिली आहे. सुपर मार्केटमध्ये ती विक्री करता येणार आहे. त्याला काही राजकीय पक्ष विरोध करत असतील तर, ते शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. उत्पादन वाढले तर, चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल, ही बाबही लक्षात घेतली पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय आहे. राजकीय पक्ष आता या क्षणी टीका-टिप्पणी करत आहे. त्यांनी थोडंसं शतकऱ्यांचं आर्थिक गणित समजून घ्यावं. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आहेत आणि ते धाडसाने घ्यावे लागतात, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here