नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारी २०२२ रोजी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. इतकंच नाहीतर तर त्या आपलं चौथं अर्थसंकल्प सादर करणार आहे. अधिक माहितीनुसार, यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे पेपरलेस असणार आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. याचविषयी जाणून घेऊयात बजेटशी संबंधित ११ मोठ्या आणि ऐतिहासिक गोष्टी:

१. भारताचा पहिला अर्थसंकल्प स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स विल्सन (James Wilson) यांनी १८६० मध्ये सादर केला होता. विल्सन यांनी १८५३ मध्ये चार्टर्ड बँक ऑफ इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि चीनची स्थापना केलीय जी १९६९ मध्ये स्टँडर्ड चार्टर्ड बँक बनली. त्यांनीच ‘The Economist’ नावाचे प्रतिष्ठित प्रकाशन सुरू केले.

बजेट सादर होण्याआधी मिळाली आनंदाची बातमी; तुम्हाला मिळणार हा मोठा दिलासा
२. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करण्यात आला. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री आरके षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता.

३. १९५५ पर्यंत, अर्थसंकल्प फक्त इंग्रजीत सादर केला जात होता, परंतु १९५५-५६ पासून, अर्थसंकल्प इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रकाशित केला जातो.

४. माजी पंतप्रधान आणि माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. पी चिदंबरम यांनी आठ वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. तर माजी अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण, सीडी देशमुख आणि प्रणव मुखर्जी यांनी प्रत्येकी सात वेळा अर्थसंकल्प सादर केला.

५. १९९८ पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी सादर व्हायचा. ब्रिटिशकालीन ही प्रथा संपवत माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. त्यांनी सकाळी १९९८-१९९९ चा अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; थोड्याच वेळात आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडणार

६. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७०-७१ मध्ये काही काळ अर्थ मंत्रालयाचा कारभारही सांभाळला होता आणि अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

७. २०१६ पर्यंत अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर होत असे. पण ही परंपरा २०१७ पासून बदलली गेली, जेव्हा तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.

८. 8. यापूर्वी रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जात होता. पण २०१७ मध्ये त्याचा केंद्रीय अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला. यामुळे ९२ वर्षांची परंपरा संपुष्टात आली.

९. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षी ओमिक्रॉन प्रकार पाहता, ७० वर्षांच्या हलवा समारंभाच्या परंपरेऐवजी मिठाईचे वाटप केले. पूर्वी बजेटच्या छपाईची सुरुवात हलवा समारंभाने होत असे.

१०. २०१९ मध्ये, पारंपारिक ब्रीफकेसऐवजी, सीतारामन यांनी लेजरमध्ये बजेट दस्तऐवज आणले (राष्ट्रीय चिन्हासह लाल रंगाचे पॅकेट).

११. देशातील सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण वाचण्याचा विक्रम सीतारामन यांच्या नावावर आहे. त्यांनी १ फेब्रुवारी २०२० रोजी दोन तास ४१ मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण दिले होते.

Budget 2022 कर रचना हवी सुटसुटीत; यंदाच्या बजेटकडून करदात्यांच्या या आहेत अपेक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here