राज्यातील सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उद्देशून टोपे यांनी एक पत्र लिहिलं आहे. त्यात टोपे यांनी या कर्मचाऱ्यांना सैनिकाची उपमा दिली आहे. राज्यात ‘करोना’चा शिरकाव झाल्यानंतर सर्वात आधी तुम्ही त्याला सामोरे गेलात. या युद्धाचं नेतृत्व केलंत. लढाईत झोकून देऊन काम करत आहात. तुमचं हे साहस अभिनंदनीय आहे. तुमच्या या कार्याला मी सलाम करतो. तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळे आतापर्यंत राज्यातील ३९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तुम्ही दाखवत असलेल्या धीरामुळे रुग्णांना मानसिक बळ मिळतेच आहे, पण आम्हालाही काम करण्याचं पाठबळ व प्रोत्साहन मिळत आहे, असंही टोपे यांनी पत्रात म्हटलं आहे.
वाचा:
‘करोनाला हरविण्यासाठी आपली लढाई अशीच सुरू ठेवू या. ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश तुम्ही सर्वसामान्यांना दिला आहे. तुम्ही देखील तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, असा सल्ला देतानाच, ‘काही सूचना असतील तर माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा, असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times