मुंबई :प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केल्यानंतर ‘येऊ कशी तशी मी नांदायला‘ ही मालिका आता निरोप घेणार असल्याचं समजतं. अभिनेत्री अन्विता फलटणकर आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर या कलाकारांनी मालिकेतील त्यांच्या कामामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अन्वितानं साकारलेली अवनी ही भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली.
या मालिकेच्या जागी स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर अभिनित ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका सुरु होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे आता ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचा शेवट नेमका कसा करणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.