औरंगाबाद : करोनाची लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा सरकार करत असताना, कोविशिल्ड लसीच्या दुष्परिणामामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा औरंगाबादच्या एका व्यक्तीने केला असल्याने खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली असून, १ हजार कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

कोरोना लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे दुष्परिणाम असल्याचा दावा करणारे सुद्धा अनेक जण आहे. पण त्यातच आता कोविशिल्ड लसीच्या दुष्परिणामामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा औरंगाबाद येथील दिलीप लुणावत यांनी केला आहे. आपली मुलगी डॉ. स्नेहल लुणावत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील दंत महाविद्यालयात होती. स्नेहल यांनी २८ जानेवारी २०११ रोजी लस घेतली. परंतु १ मार्च २०११ रोजी त्यांचा लसीकरणाच्या दुष्परिणामुळे मृत्यू झाला, असल्याचा दावा दिलीप लुणावत यांनी केला आहे.

Budget २०२२ : ‘मध्यमवर्गियांसमोर २५ दिवसांच्या बजेटची चिंता’
लुणावत यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकारसोबतच लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट आणि सिरमचे भागीदार बिल गेट्स यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. तर १ हजार कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा सुद्धा याचिकेतून करण्यात आला आहे.

ओमिक्रॉनचा धोका संपला नाही! WHO कडून नवीन अलर्ट जारी, प्रत्येकाला केलं आवाहन
सरकारने ही मान्य केलं…..

यावेळी लुणावत यांनी केलेल्या याचिकेत केंद्र सरकारच्या एडएफआय या समितीने आपल्या मुलीचा कोविशिल्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे मृत्यू झाल्याचे मान्य केल्याचेही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता असून, न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

खळबळजनक! ६ दिवसांपासून बेपत्ता होते पोलीस कर्मचारी, आज समोर आली धक्कादायक बातमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here