जालना : सध्याच्या कलयुगात कोणाचा कसा मृत्यू होईल याचा काही नेम नाही. असाच एक धक्कादायक प्रकार जालन्यात समोर आला आहे. रस्त्याच्या कडेला ट्रक थांबून स्वयंपाक बनविण्यासाठी पाणी आणायला गेला तो परतलाच नाही. ट्रकच्या क्लिनरचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील नायगाव मंडी येथील ट्रकचालक शंकरसिंग योगी (वय ३२) आणि त्याचा चुलतभाऊ क्लिनर प्रेम भवानीनाथ योगी (वय ३५) हे दोघे पंजाब प्रांतातील लुधियाना येथून टाटा ट्रकमध्ये (आरजे-२०, जीसी-५६५१) मोटार सायकलचे ट्यूब आणि टायरचा साठा घेवून चैनईकडे निघाले होते.

धक्कादायक! करोनाची लस घेतल्यानेच मुलीचा मृत्यू; पित्याने न्यायालयात भरपाई म्हणून मागितले तब्बल…

सोमवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान जालना ते भोकरदन रोडवरील मानदेऊळगाव शिवारातील कुक्कुटपालन जवळ ट्रक रस्त्याच्या कडेला उभी करून जेवण बनविण्यासाठी थांबले होते. ट्रक चालक शंकरसिंग हे स्वयंपाकाची तयारी करीत असतांना रोड पार करून क्लिनर प्रेम योगी हे पाणी आणण्यासाठी गेले होते. बराच वेळ झाला तरी ते परत न आल्यामुळे शोधाशोध केली असता प्रेम योगी यांचा रोडवर अस्थव्यस्त पडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेने त्यांचा मृत्यू झाला असून अज्ञात वाहनचालक फरार झाला आहे. घटनेची माहिती कळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

वर्ध्यातील ७ भावी डॉक्टरांच्या अपघातापूर्वीचा VIDEO आला समोर, दृश्य पाहून तुम्हीही हादराल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here