महेश हा आपली दुचाकी घेऊन मित्र वैभव धर्माधिकारी याच्यासोबत राजापूरकडून सिंधुदुर्गकडे पोंबुर्ले येथे आपल्या बागेकडे जात होता. कोंडये येथे त्याच्या दुचाकीचा टायर फुटला व हा अपघात झाला. यात महेश याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर सहकारी वैभव धर्माधिकारी हा किरकोळ जखमी झाला आहे. महेश हा होतकरू तरूण होता. दोन वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. हॉटेल व्यवसाय सांभाळण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता. अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघाटे करत आहेत.
दुचाकीवरून खाली पडून महिलेचा मृत्यू
रत्नागिरी शहराजवळ खेडशी तिठा येथे दुचाकीवरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास झाला होता. ममता मधुकर सावंत (वय ५३, रा. खेडशी बौद्धवाडी) या शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घरातून खेडशी तिठा येथे पायी जात होत्या. यावेळी त्यांनी स्वप्नतेज कांबळे यांच्याकडे लिफ्ट मागितली. त्यानंतर त्या दुचाकीवर मागे बसल्या. अंतर्गत रस्त्यावरून जात असताना ममता अचानक दुचाकीवरून खाली पडल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सूर्वे करीत आहेत.